PM wani Yojana Maharashtra:मित्रांनो पीएम वाणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत जारी करण्यात आलेला आहे तरी ही योजना काय आहेयाबद्दलची माहिती आपण पाहूया.PM wani Yojana Maharashtra
PM wani Yojana Maharashtra:
शासनाच्या वतीने सदर योजना चालू करण्यात आली असून याबाबत आज १४ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्य सरकार ने जरी केला आहे.
पीएम वाणी योजनेचे उद्दिष्ट पाहूया:
- सर्व सार्वजनिक ठिकाणी लोकांना परवडणाऱ्या दरात वायफाय तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा हेतू आहे
- ही योजना सुरू करण्याचे कारण देशातील अनेक भागात विशेषता ग्रामीण भागात जिथे इंटरनेट सुविधा कमी अथवा अतिशय कमी आहे अशा ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे
- या योजनेद्वारे देशातील नागरिकांना इंटरनेटची जोडले जाऊ शकते त्यामुळे वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेला लोकांचे उत्पन्न वाढेल आणि लोकांची जिवंत शैली सुधारेल
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना इंटरनेटचा लाभ घेता येणार असून डिजिटल इंडिया ला प्रोत्साहन देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहेPM Wani Yojana maharashtra
या योजनेची वैशिष्ट्ये:
- सार्वजनिक डेटा कार्यालय, ॲग्री गेटर जे शेवटच्या घटकांना एकत्र करतील. त्यांना कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. या ॲग्रीकेटरला फक्त नोंदणी करावी लागेल यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज प्राप्त झाल्यापासून सात कामकाजाच्या दिवसात नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- रास्त भाव दुकानदार वाय-फाय राऊटर खरेदी करून दुकानात बसवतील. रास्त भाव दुकानदार चालवणारा दुकानदार सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून इंटरनेट सुविधा देईल या योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या डेटांचा दर सरकार निश्चित केलेला नाही.PM wani Yojana Maharashtra
पीएम वाणी योजनेचा लाभार्थी:
- रास्त भाव दुकानदारांपासून शंभर ते 200 मीटरच्या परिसरात येणाऱ्या सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- अल्प रक्कम भरून कोणत्याही नागरिक इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतो
- या योजनेद्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना इंटरनेट सेवा मिळणे जेणेकरून त्यांचा अभ्यास करण्यास मदत होईल
- इंटरनेट कनेक्शन शिवाय दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेस चा लाभ घेता येईलPM Wani Yojana
पीएम वाणी योजना महत्त्व व फायदे:
पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून वायफाय मध्ये मोठी क्रांती होईल ज्यामुळे लोकांमध्ये व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि त्याचवेळी रोजगारांच्या संधी देखील वाढतील.
डिजिटल इंडियाच्या दिशेने पीएम आणि योजनेच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी वरदान ठरेल
घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएम आणि योजना देशभरात सुरू करण्यात आली आहे.
शासन निर्णय / फॉर्म
आपल्या whats app ग्रुप ला जॉईन व्हा