पात्रता आणि लाभ:-
1. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ते 50 वर्षाच्या आत वय असलेले भारताचे नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
2. दरवर्षी 330 रुपये भरावे लागणार.
3. अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
5. विमा पॉलिसी घेतल्यापासून 45 दिवस योजनेचा लाभ घेता येत नाही. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळते.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे ओळखपत्र.
- बँक खाते पासबुक.
- पासपोर्ट साईज फोटो.
- मोबाईल नंबर.
- बँक खात्याला आधार नंबर लिंक असावा.
असा करा अर्ज:-
मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या जवळील नॅशनल बँकेत किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता.