nuksan bharpai gr
अतिवृष्टी निकाषा नुसार मंडळामधील 24 तासात मध्ये 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद.
जिराईत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी हेक्टर 6800 रुपये आणि दोन हेक्टर मर्यादा होती आता ही मर्यादा 13600 प्रति हेक्टर करून दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादा वाढवले आहे त्याचबरोबर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टर 13500 मिळत होते परंतु आता 27 हजार रुपये करण्यात आलेले आहे आणि बहुवार्षिक पिकांसाठी पहिले मिळत होते 18000 रुपये परंतु आता 36 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.”rain in india”
जिथे अतिवृष्टी निकाषा नुसार मंडळामधील 24 तासात मध्ये 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झालेली असेल आणि शेत पिकांचे नुकसान 33% मंडळामधील गावात झाले असल्यास त्यांनाही मदत अनुज्ञेय असणार आहे जे शेतकरी नुकसान भरपाई चे लाभार्थी असेल त्यांच्या बँके खात्या मध्ये ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम बँकेत जमा करण्यात येणार आहे व शेतकरी लाभार्थींना मदत वाटप केल्या नंतर यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.”rain in india”
आणि त्याचबरोबर जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि विविध जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता आणि शेत पिकांचे नुकसान झाले होते व नुकसाना पोटी विविध करण्यात आलेल्या दराने मदत देण्याबाबत सर्व प्रस्ताव विभागीय आयुक्त कडून प्राप्त झाले होते त्यानुसार मदत वाटप करण्यासाठी 3995 कोटी 32 लाख रुपयाचा निधी विवरित करण्याची मान्यता शासनाकडून देण्यात आले आहे.